प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.

भारती युद्धान्तापासून कलियुग सुरू झालें असें धरतात. तर आपण त्या कालापासून आंध्रविनाशापर्यंतच्या राजघराण्यांचें एक दीघ अवलोक करूं. चंद्रगुप्ताच्या कालापूर्वींच्या निश्चित तारखा म्हणजे बुद्धाच्या आयुष्यविषयक होत. बुद्धाशीं समकालीन राजांची बौद्ध ग्रंथावरून अधिक माहिती मिळते. इतरांसबंधीं याद्यांवरच भिस्त ठेवावी लागते. पुराणांतील याद्यांच्या जुळणीसंबंधानें अनेक विद्वानांनीं परिश्रम केले आहेत. त्यांच्या प्रयत्‍नांचें स्वतःच्या प्रयत्‍नाची भर घालून संयोजक फल पार्गिटेर यानें कलियुगांतील राजघराण्यांवर एक पुस्तक लिहून दिलें आहे. पार्गिटेरचें विवेचन थोडक्यांत येणें प्रमाणें:-